शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली…? धनंजय मुंडे म्हणाले, “भाजपा.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ ला मोठी उलथापालथ झाली. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे.
अजित पवारांसह आमदारांनी केलेल्या बंडावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.
शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? ईडी, सीबीआयच्या नोटीसांमुळे भाजपाबरोबर गेलात का? या प्रश्नांवर धनंजय मुंडे म्हणाले, “शरद पवार हे आमचा आधार आणि दैवत आहेत. पण, भाजपाचा आधार घेणं किंवा बरोबर जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घेतलेली भूमिका आहे. ५ जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.”
“ईडी, इन्कम टॅक्सच्या नोटीसा आज नाहीतर, गेल्या अनेक वर्षापासून आल्या आहेत. मात्र, याच्या भीतीने आम्ही भाजपाबरोबर गेलो, हे लोकांमध्ये पसरवलं जातं. राष्ट्रवादीच्या उभारणीत स्वाभीमान हा विषय होता. हा पक्ष लोकशाही मानणार आहे. आमच्यासाठी दैवत आणि आधारस्तंभ शरद पवारच आहेत. लोकप्रतिनिधींची कामे आणि मतदारसंघाचा विकास होणे याला आमदार म्हणून आम्ही उत्तरदायीत्व आहे,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
तुम्ही दैवताला देवाऱ्यातून बाहेर काढलं आणि देवाऱ्यावर अर्थात पक्ष, चिन्हावर दावा केला, असे विचारल्यावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं, “देव देवाऱ्यात आणि मनात आहे. देवाऱ्यात जाऊन पूजा करू नका, हे देवाने सांगितलं, तरी भक्त देवाचं मंदिर मनात करून पूजा करत असतो.”

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….