बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वातील भव्य दिव्य मोर्चाने मणिपूर घटनेचा निषेध करीत दिले राष्ट्रपतींना निवेदन ; मणिपूर घटनेतील आरोपींना फाशी देऊन केंद्र व राज्य सरकारने आपले पुरुषत्व सिद्ध करावे :- बिरसा मुंडा ब्रिगेड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- मणिपूर येथे आदिवासी महिलांना नग्न करून धिंड काढलेल्या निर्दयी घटनेचा व मध्यप्रदेश मधील आदिवासी तरुणाच्या अंगावर लघू शंका केलेल्या अमानवीय घटनेचा तसेच तेथील राज्य सरकार / केंद्र सरकार यांनी जाणीवपूर्वक या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध व्यक्त करीत बिरसा ब्रिगेडच्या भव्य मोर्चा ने राष्ट्रपती यांना निवेदन सुपूर्द केले.
दोन महिन्यापूर्वी मणिपूरमधील दोन कुकी आदिवासी समाजातील स्त्रियांना नग्न करून त्यांची सार्वजनिक धिंड काढण्यात आली. त्यांचेवर घृणास्पद लैंगीक अत्याचार करण्यात आले. ही घटना एका व्हिडीओ क्लीपद्वारे उघडकीस आलेली आदिवासी स्त्रीयांची नग्न धिंड आणि त्यांची शारीरीक विटंबनेची क्रूर व अमानुष घटना मानवतेला कलंक आहे. या घटनेचा तसेच स्त्रीयांवरील अशा सर्व प्रकारच्या अत्याचाराचा धिक्कार करीत. तसेच काही दिवसापूर्वी मध्यप्रदेश मधील एका असहाय्य आदिवासी तरूणाच्या अंगावर सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या एका कार्यकर्त्याची खुलेआम लघूशंका करतांनाची व्हीडीओ क्लीप व्हायरल झाली ही बाब सुध्दा घृणास्पद आहे या दोन्हीही घटनांचा या निवेदनाव्दारे निषेध केला.
मणिपूर सरकार व मध्यप्रदेश राज्य सरकारने याबाबत गुन्हेगारांवर तात्काळ कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यांचा सुध्दा निषेध नोंदवित आहे. मणिपूर येथील आदिवासी महिलेची नग्न दिंड काढणे म्हणजे संपूर्ण देशातील स्त्रियांचा अवमान करणारी घटना आहे. ही एका समाजालाच नव्हे तर संपूर्ण देशाला लाजवणारी घटना आहे. अशा असभ्य कृतीचा निर्लज्ज राज्य व केंद्र सरकारने दखल न घेणे म्हणजे त्यांच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे मणिपूर सरकारने आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्यात अक्षम्य चूक केली आहे. अशा नपुसक सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यामुळे मणिपूरच्या या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून आदिवासीच नव्हे तर देशातील कोणत्याही स्त्री जातीवर असे लज्जास्पद प्रकार घडू नये यासाठी कारवाई करून केंद्र व राज्य सरकारने आपले पुरुषत्व सिद्ध करावे. अन्यथा यानंतर अशा प्रकारच्या घटनांवर आवर घालण्यासाठी विकृत मानसिकतेच्या नराधमांना व राज्य तसेच केंद्र सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा बिरसा ब्रिगेडच्या मोर्चेक-यांनी दिला. बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुका अध्यक्ष मारोती भस्मे, तालुका अध्यक्ष सुनिता मळघने, व सल्लागार सुरेश धनवे यांच्या नेतृत्वात क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकातून निघालेला मोर्चा, महिला के सन्मान मे बिरसा ब्रिगेड मैदान मे अशा घोषणा देत आणि मनिपुर आणि केंद्रातील भाजप सरकारच्यानिषेधाच्या घोषणा देत निघालेल्या आजच्या मोर्चामध्ये महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यामध्ये मनीषा बेले, शिल्पा सरकुंडे,, उषा टारफे, कुसुम मारकड, मिनाक्षी व्यवहारे, शोभा कांबळे, सविता धनवे, शांताबाई बेले, नंदा उघडे, छाया बळी सविता इंगोले महानंदा वंजारे मीरा नांदे पुष्पा वंजारे संगीता कुरकुटे मथुरा धुमारे पार्वती आसवले संगीता काळे सुभद्रा कराळे अजय धंगारे, नाना बेले , अर्जुन हगवणे, किशोर कांबळे, गजानन उघडे, साकिब शहा, युवराज भांगे, रामदास भडांगे, शरद ढेंबरे नारायण कराळे, दुर्गादास ढाकरे वसंता चिरमाडे, गणपत गव्हाळे, संजय डुकरे दत्ता खंदारे युवराज भांगे बालाजी बेले गणेश भुजाडे गजानन टाले सखाराम इंगळे गजानन भोगे रामकृष्ण चौधरी वसंत चिरमाडे अजगर शेख राजू पेदेवाड, श्याम देवकुळे विनोद राठोड पारेश्वर दळवे अनिल खंदारे विठ्ठल मिरासे शिवाजी मारकड रामकृष्ण धनस्कर सुखदेव तुम्हारे प्रकाश भोसले ज्ञानेश्वर मेटकर इंगोले, माधवराव वैद्य गणपत काळे, ॲड आरिफ अहेमद, अनंत माळकर, हरिदास बोके बबलू काजी बापूराव कोतेआदींसह शेकडोंच्या उपस्थितीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यामार्फत राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.