शिंदे गट भाजपामध्ये विलीन होणार…? राष्ट्रवादी नेत्याचं मोठं वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतील गेलेल्यआ नेत्यांवरून आणि आगामी निवडणूकीवरून मनमोकळा गप्पा मारताना शिंदे गट आणि भाजपवर टीका केली.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयाराम आणि गयाराम यांची भाजपमध्ये सध्या जोरदार प्रवेश होत आहेत. त्यावरून टीका करताना त्यंनी शिंदे गटाबाबत ही मोठा दावा केला. त्यांनी अनेक लोकं राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे तेथेच निष्ठावंतांना आणि पक्ष प्रवेश केलेल्यांना कुठ बसवायचं असा पेच निर्माण झाला आहे. तर नुकताच शिवसेनेतून फुटलेला आणि भाजपच्या सोबत असलेला शिंदे गट त्यांच्यात कधी म्हणता म्हणता भाजपवासी होतील हे सांगता येणार नाही. त्यामुळं भाजपतं जी लोकं गेलीत या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलली गेले आहेत, हे पक्क असल्याचं ते म्हणालेत.