पुढचे काही दिवस राज्यात हुडहुडी कायम ; विदर्भा मध्ये तापमानात सर्वाधिक घसरण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मकर संक्रांतीपासून थंडी जास्त वाढत चालली आहे.
१५ जानेवारीपासून १८ जानेवारीपर्यंत ही थंडी कायम राहणार आहे.
महाराष्ट्रात सध्या तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. सोमवारी गोंदियामध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली. गोंदियात तापमानाचा पारा ११.५ अंश इतका घासरला आहे. तर गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी पारा सरासरीपेक्षा जास्त असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.
नागपूरमध्ये १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच अकोल्यात पुढच्या २४ तासांत बदल जवण्याची शक्यता आहे. सध्याच्या तापमानापेक्षा २ अंशाने तपमानात वाढ होऊन १५.२ अंश तापमान होऊ शकतं. अमरावतीत मात्र थंडी कायम आहे. सरासरी तापमान आहे तसेच पुढचे २ दिवस कायम राहणार आहे. सध्या अमरावतीत १३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली वगळता सर्वत्र तापमानात थोडी वाढ होऊ शकते. तापमान सरासरी पेक्षा वरती जाण्याची शक्यता आहे. अशात पश्चिमी वाऱ्यांमुळे पुढचे काही दिवस आणखीन कडाक्याची थंडी पडू शकते. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडी सरासरी असेल तर विदर्भात काही प्रमाणात आणखी घसरण होईल. १८ ते २० जानेवारी या काळात थंडीचा प्रभाव जास्त वाढू शकतो.