‘समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात बाळासाहेबांचा अपमान’, संजय राऊतांचा थेट आरोप…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाले होते. पण हे त्यांचं ढोंग आहे. फक्त बाळासाहेबांचा उल्लेख मोदींनी केला आहे.
पण त्यांची प्रतिष्ठा जपणारे असे कोणतेही वर्तन तिथे केले नाही. तिथे जे छायाचित्र लावले होते, तिथे चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब होते’ असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नवी दिल्लीमध्ये धनुष्यबाण चिन्हाबाबत आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. या निमित्ताने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
‘आम्ही गट वगैरे मानत नाही. शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये सुनावणी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याही वाया जाणार नाही. धनुष्यबाण हे उध्दव ठाकरे यांचे आहे.
निर्णय हे आम्हालाच मिळणार आहे, असा दावा राऊत यांनी केला.
‘समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाले होते. पण हे त्यांचं ढोंग आहे.
फक्त बाळासाहेबांचा उल्लेख मोदींनी केला आहे. पण त्यांची प्रतिष्ठा जपणारे असे कोणतेही वर्तन तिथे केले नाही. तिथे जे छायाचित्र लावले होते, तिथे चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब होते. पंतप्रधानांनी 11 तारे दिल्याचा उल्लेख केला.
पण त्यामुळे पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे हे दोन तारे आहे, त्यांचा अवमान आणि अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रखर सुर्य आहे, त्यांच्याबद्दल राज्यपालांनी विधान केलं होतं, ते तिथे बसलेले होते, अशी टीकाही राऊत यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चितांमणराव देशमुख यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचा अपमान करणारा व्यक्ती व्यासपीठावर आहे, मी इथं कसा बसणार, इथं तुम्ही कसे आले असं विचारतील असं वाटलं होतं. पण, मोदींनी शिंदेंच्या पाठीवर थाप मारली, ती थाप यासाठी असावी असावी शाब्बास बाळासाहेबांची शिवसेना फोडल्याबद्दल होती का, जे औरंगाजेबला जमले नाही, तुम्ही खंजीर खुपसून दाखवला त्यासाठी ती थाप होती का, असा टोलाही राऊत यांनी शिंदेंना लगावला.
बाळासाहेबांना चौथे स्थान दिले होते, हे लोकांनी निदर्शनास आणून दिले आहे. तुम्ही हे सगळ सहन करत आहे का, अस्मिता वगैरे आहे की नाही, महाराष्ट्राच्या नशिबाला हे काय आले आहे, अशी मोठी खंत आहे. कर्नाटकच्या मुद्यावर मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांना काही बोलतील असं वाटत होतं, पण ते तिथे उभे होते, त्यांनी काही विचारलं नाही.
महाराष्ट्र कान ऐकून होता, पण हे काहीच बोलले नाही. ते गप्प आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आहे, मंत्री आहे, अशा प्रकाराचा शाईहल्ला करणे याचे समर्थन होणार नाही. अशा प्रकारचे हल्ले आधीही झाले आहे. सामनावर हल्ला झाला, त्यावर ही लोक टाळ्या वाजवत होते. याचा विचार केला पाहिजे. पत्रकार बोलत असतात, आंदोलनांच्या भावनेचा विचार केला पाहिजे, पण आम्ही शांत आहोत, असा सल्लाही राऊत यांनी पाटील यांना दिला.