“देशातील ‘इमानदार नेता’ म्हणून फक्त मी च छाती ठोकून सांगू शकतो” ; अरविंद केजरीवाल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- आज देशातील राजकारणात उभं राहून सांगू शकतो की मी कट्टर इमानदार नेता आहे. आज देशात असा एकही नेता स्वत: ला इमानदार म्हणून सांगू शकेेल. आज भाजपच्या नेत्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी स्वत: उभं राहुन सांगावं की इमानदारीने काम केलं आहे.
त्यामुळे विरोधक आमच्यावर राजकीय चिखलफेक करीत आहे. असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर दिल्ली महानगरपालिकेसाठीही 5 डिसेंबरला मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपला आपचा मोठा सामाना करावा लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून आपवर निशाणा साधला जात आहे.
त्यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपला आवाहन दिलं आहे. आजपर्यंत आम आदमी पार्टीतील अनेक नेत्यांची चौकशी करण्यात आली. सर्व केंद्रीय तपास यंत्रणा नेत्यांच्या पाठीमागे लावून दिल्यात. परंतु आजपर्यंत एकही नेत्यांबाबत ठोस पुरावा गोळा करू शकले नाहीत. तसेच त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी 18 तास काम करीत असल्याचं सांगत आहेत. परंतु त्यांनी जर कमीत कमी 2 तास तरी काम केलं तरी देशातील समस्या दुर होतील. असा टोलाही अरविंद केजरीवाल यांनी लगावला.