शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना झटका ; घेतला हा मोठा निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर शिंदे सरकार राज्यात स्थापन झालं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहाची दिल्लीत भेट घेतली.
मुख्यमंत्री शिंदेनी कामाला लगेच सुरवात केली. अनेक निर्णय हr घेतले आहेत. यातील बहुतांश निर्णय हे ठाकरे सरकारचा विरोध असलेल्या गोष्टीसांठी घेतलं असल्याच दिसून आलं आहे. यातच आता शिंदे सरकारने मविआला अजून एक धक्का दिला आहे.
सरकार कोसळणार असल्याचं लक्षात येताच ठाकरे सरकारने नामांतराबरोबरच एक निर्णय घेतला. अचानकपणे अनेक कोटींचा जीआर काढण्यात आला. हा आकडा सहा हजार कोंटिच्या पुढे गेला होता. या 5020 कोटिच्या जीआरला शिंदे सरकारन तुर्तास स्थगिती दिली आहे. जी कामे प्रत्यक्षात सुरु झाली नाहित त्यांना शिंदे सरकारने स्थगित दिली आहे. यामुळे ठाकरे सरकारला आणखी धक्का बसला आहे.
शिंदे गट अस्तित्तवात आल्यानंतर अनेक गोष्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदेंच्या सरकारने 2022-23 या आर्थिक जिल्हा विकास प्रकल्पातर्गंत देण्यात येणारा निधी रोखला आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारचा आर.ए चा निर्णय बदलला. आर. ए कारशेडच 25 काम पर्ण झाल असल्यांचा दावा भाजप कडून करण्यात येत आहे. त्यामुळे मेट्राचे काम पुन्हा आर.ए कडे वळवण्यात येणार आहे, असं जाहीर केलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि 40 आमदारांनी केलेला बंड हा सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरला. ठाकरे सरकारकडून विकास कामासाठी निधी मिळत नसल्यांच्या आणि हिदुत्वांच्या विचारांची फारकत होत असल्याचा आरोप आमदारांनी केला. त्यांची नाराजीचं कारण त्यांनी हेच सांगितलंय.