पंजाब मधील आप आमदारांच्या ठिकाणावर सीबीआयचे छापे ; निवडणुकी जिंकल्यानंतर म्हणाले होते मी एक रुपया पगार घेईल , आता ४० कोटींच्या बँक अडकले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) आमदार जसवंत सिंह गज्जनमाजरा यांच्या जागेवर सीबीआयने छापा टाकला आहे. ४० कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे.
सुरुवातीच्या छाप्यात सीबीआयला स्वाक्षरी केलेले ९४ कोरे धनादेश मिळाले आहेत. अनेकांची आधार कार्डेही सापडली आहेत. १६.५७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी ८८ विदेशी चलनी नोटा, मालमत्तेची कागदपत्रे, अनेक बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या छापेमारी सुरू आहे.
गज्जनमाजरा हे अमरगड विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार आहेत. सीबीआयने गज्जनमाजऱ्याच्या सर्व ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. संगरूरच्या मालेरकोटला येथे ३ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. हा तोच आमदार आहे ज्याने निवडणूक जिंकल्यावर फक्त एक रुपये पगार घेणार असल्याचं शपथपत्र दिलं होतं.
आतापर्यंत ही वसुली
सुरुवातीच्या छाप्यात सीबीआयला स्वाक्षरी केलेले ९४ कोरे धनादेश मिळाले आहेत. अनेकांची आधार कार्डेही सापडली आहेत. १६.५७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी ८८ विदेशी चलनी नोटा, मालमत्तेची कागदपत्रे, अनेक बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या छापेमारी सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयकडून अद्याप कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही.
२०११ ते १४ या कालावधीत कर्ज घेतले होते
आपचे आमदार जसवंत सिंह गज्जनमाजरा यांनी २०११ ते २०१४ दरम्यान बँकेकडून ४ हप्त्यांमध्ये कर्ज घेतले होते. हे कर्ज सुमारे ४०.९२ कोटी होते. बँकेच्या लुधियाना शाखेने याबाबत सीबीआयकडे तक्रार केली. ज्यामध्ये गज्जनमाजरा यांनी ज्या उद्देशाने कर्ज घेतले होते त्याऐवजी अन्य ठिकाणी त्याचा वापर केल्याचे म्हटले होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…