नवाब मलिक प्रकरणी ठाकरे सरकारचा “हा” मोठा निर्णय……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
परिणामी आता मलिक यांच्याबाबत ठाकरे सरकारनं (Thakeray Government) मोठा निर्णय घेतला आहे.
नवाब मलिक यांच्याकडं अल्पसंख्यांक मंत्री आणि कौशल्य, उद्योजकता, रोजगार या खात्यांचा कारभार होता. राष्ट्रवादीच्या प्रस्तावानंतर उद्धव ठाकरेंनी आता या खात्यांचा कारभार अन्य मंत्र्यांना सोपवला आहे. राजेश टोपे (Rajesh Tope) कौशल्य विकास खातं तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अल्पसंख्यांक खातं सांभाळणार आहेत.
नवाब मलिक यांच्याकडं असणाऱ्या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील काढून घेण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपच्या मोठ्या विरोधानंतरही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला गेला नाही. राज्यातील जनतेचं काम अडकू नये म्हणून इतर मंत्र्यांकडं कारभार सोपवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…