शुक्रवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन :- राजू शेट्टीची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच आहे.
राज्यभर रस्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज सायंकाळी पत्रकारांना दिली.
सरकार येत्या काही दिवसात आम्हाला चर्चेसाठी बोलण्याची शक्यता आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा सकाळी फोन आला होता. त्यांनी याप्रश्नी चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. आम्हीही चर्चेबाबत सकारात्मक आहोत. सरकार येत्या काही दिवसात आम्हाला चर्चेसाठी बोलण्याची शक्यता आहे. जोपर्यंत यातून मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. धरणे आंदोलन सुरू ठेवूनच मी चर्चेत सहभागी होणार आहे.
नितीन राऊत उघडा डोळे बघा नीट
दरम्यान राजू शेट्टी यांनी आज सकाळी त्यांच्या फेसबूक पेजवरुन नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. शेट्टी म्हणतात, काल दुपारी आण्णासो गिराजे मु. पो. दत्तवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील शेतक-यांच्या शेतीपंपास जवळपास १३ फुट मगरीने वेटोळे घातलेले होते. कदाचित हि वेळ रात्रीची असती तर होत्याच नव्हत झाल असत. आजपर्यंत या मगरीने १ घोडा व अनेक शेळ्या मेंढ्या फस्त केल्या आहेत. नितीन राऊतजी आतातरी जरा उघडा डोळे बघा नीट ! असेही ते म्हणाले.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….