१० मार्चनंतर मंत्रीमंडळात बदल , दिल्लीवारीनंतर पटोलेंचं वक्तव्य…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. येत्या १० मार्चला या सर्व निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास १३ महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्चनंतर राज्यात सत्तापालट होणार असल्याचा दावा केला होता.
यानंतर सत्तेत असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही १० मार्चचा उल्लेख केला आहे. नुकतेच नाना पटोले दिल्लीवारीवरून माघारी आले आहेत. हायकमांडसोबत त्यांची खलबलं झाल्याची माहिती मिळत आहे. याला खुद्द त्यांनीच भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात दुजोरा दिलाय.
सध्याच्या सरकारमध्ये जे काही सुरू आहे, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची वेळ आली असून 10 मार्चनंतर हे काम करणार असल्याचे वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यानिमित्ताने १० मार्चची चर्चा सुरू झाली होती. त्यात आता पटोलेंनीही उडी घेतलीय.
भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये अनेकांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे सूचक वक्तव्य केलं. नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे 10 मार्चनंतर सरकारमध्ये बदल पाहायला मिळतील. त्यामुळे नाना पटोले 10 मार्चनंतर नेमकी कोणती पावले उचलणार आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..