गेल्या 24 तासात 101 पॉझिटिव्ह ; 178 कोरोनामुक्त ; एक मृत्यू ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1704 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1738
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 01 फेब्रुवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात 101 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 178 जण कोरोनामुक्त झाले असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1706 व बाहेर जिल्ह्यात 32 अशी एकूण 1738 झाली असून त्यातील 53 रूग्ण रूग्णालयात तर 1685 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 965 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 101 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 864 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 77713 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 74182 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1793 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्यांमध्ये डोर्लीपुरा यवतमाळ येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 101 रूग्णांमध्ये 48 महिला व 53 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील एक, बाभुळगाव एक, दिग्रस दोन, घाटंजी आठ, कळंब एक, मारेगाव आठ, नेर 13, पांढरकवडा एक, पुसद 22, उमरखेड दोन, वणी पाच, यवतमाळ 34 व इतर जिल्ह्यातील तीन रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 19 हजार 472 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 41 हजार 480 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.48 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 10.47 आहे तर मृत्यूदर 2.31 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1704 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 62 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1704 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 60 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 727 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी 2 बेड उपयोगात असून 855 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.