पवार-ठाकरेंनी कांग्रेस ला गंडवलं ; पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष होऊ नये म्हणून….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये लेटर वॉर रंगल. राज्यपालांनी आवाजी मतदानावर आक्षेप घेतल्यानंतर महाविकास आघाडीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या सर्व घडामोडींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला गंडवलं असा थेट आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीकडे १७० आमदार आहेत तर भाजपकडे १०५ आमदार आहेत. त्यामुळे गुप्त मतदान पद्धतीने का मतदान केले नाही. तसे करून पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष करता आले असते. मग का नाही केले मतदान, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसेच राज्यपालांना बळीचा बकरा बनवण्याचं काम शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणी नेता विधानसभा अध्यक्ष नको होता म्हणून शरद पवार व उद्धव ठाकरेंनी आवाजी मतदानाचे नाटक केले का? असा सवाल सोमय्या यांनी केला. शरद पवार यांनीच काँग्रेसचा गेम केला असेही किरीट सोमय्या यांनी म्हंटल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….