ओमायक्रोनचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात ; तिसरी लाट ओमायक्रोनची तर “लॉकडाउन” निश्चित :- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा दिवसाला ऑक्सिजनची गरज 800 मेट्रिक टन झाली तेव्हा राज्य लॉकडाऊन करण्यात आले होते. आता ओमायक्रोनचा संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. ही वाढ अशीच राहिली तर ऑक्सिजनची ही मर्यादा 500 मेट्रिक टनवर आणून राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे
कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रोनमुळेच येईल. म्हणूनच जनतेने आरोग्याचे नियम पाळावेत, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.
आम्हाला निर्बंध लावायचे नाहीत. ते लावणे हा आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये.
केरळ , महाराष्ट्र, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या 10 राज्यांमध्ये आरोग्य पथके पाठवण्याचा निर्णय पेंद्र सरकारने घेतला आहे.
देशात 449 ओमायक्रोनबाधित
महाराष्ट्र ः 110 , दिल्ली ः 79, गुजरात ः 49, राजस्थान ः 43, तेलंगणा ः 41, केरळः 37, तामीळनाडू ः 34, कर्नाटक ः 31, आंध्र प्रदेश ः 4, हरयाणा ः 4, ओडिशा ः 4, पश्चिम बंगाल ः 3, उत्तर प्रदेश ः 3, जम्मू-कश्मीर ः 3, चंदिगड ः 1, लडाख ः 1, उत्तराखंड ः 1.