परीक्षा घोटाळ्याची तार मंत्रालयापर्यंत :- देवेंद्र फडणवीसच्यां आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एकही नोकरभरती घोटाळ्यांशिवाय झालेली नाही. या घोटाळ्यांची तार मंत्रालयापर्यंत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केला.
इतर कामकाज बाजूला ठेवून पेपरफुटीबद्दल चर्चा करावी, अशी मागणी करीत फडणवीस यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तो फेटाळला; मात्र, या विषयावर सभागृहात स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, आरोग्य, म्हाडा, टीईटी अशा सगळ्याच परीक्षांमध्ये गडबडी झाल्या. एकेका पदासाठी २० लाखांची बोली लागली होती. एकट्या अमरावतीत २०० जणांनी पैसे दिले. दलाल रेटकार्ड घेऊनच फिरत होते. अनेक पुरावे यासंदर्भात आपल्याकडे असून चर्चेच्या वेळी ते आपण मांडू.
काँग्रेसचे नाना पटोले यांनी, हे घोटाळे कधीपासून सुरू झाले, असा सवाल करीत आधीच्याही सरकारमध्ये या घोटाळ्याची तार असल्याचे सूचित केले. या विषयावर सभागृहात स्वतंत्रपणे चर्चा झालीच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..