पोलिसांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा दबाव ; आमचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ; मुंबईत तिरंगा रॅली होणारच :- खासदार इम्तियाज जलील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे या साठी एमआयएम तर्फे तिरंगा रॅली आणि मुंबईत ११ डिसेंबर रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेसाठी मुंबईत हॉल, मैदान मिळु नये, रॅलीस परवानगी मिळुन नये या साठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पोलिसांवर दबाब आणण्यात आला व आमचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न रचला जात आहे.
तरीही शनिवार (ता.११) रोजी सकाळी ७ वाजता औरंगाबादच्या आमखास मैदानात येथून तिरंगा रॅली काढली जाणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत मुंबईत सभा होईल अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवार (ता.१०) पत्रकार परिषदेत दिली.