महाराष्ट्र सरकार आहे पण शासन नाही फडणवीसांची ठाकरे सरकार वर टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- महाराष्ट्रातील सरकारने जनतेसाठी कुठलंही काम केलं नाही. या सरकारने दारूवरील कर कमी केला. पण, पेट्रोल-डिझेलवरील दर कमी केला नाही. इथं कुठलंही शासन नाही. जिथे शासन असते तिथे धोरण असतं.
पण, महाराष्ट्रात या दोन्ही गोष्टी नाहीत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. उद्योजकांसोबत अनेकजण चर्चा करतात. त्यामुळे उद्योग बाहेर जातीलच असे नाही. आमच्या सरकारमध्ये उद्योग बाहेर गेले नव्हते. पण, त्यावेळी कोणी चर्चा करण्यासाठी आलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यावर टीका करत होते. उद्योग पळविण्यासाठी बाहेरचे लोक राज्यात येतात अशी टीका आमच्यावर करण्यात आली होती. महाराष्ट्रातले उद्योग कोणीही कुठं नेऊ शकत नाही. पण, हे शासन अपयशी राहिलं तर महाराष्ट्रातील उद्योग नक्की बाहेर जातील, असेही फडणवीस म्हणाले.
कोणावर कारवाई करावी कोणावर करू नये, याबाबत सरकारमध्ये संभ्रम आहे. परमबीर सिंह यांच्यावर कारवाई केली, तशी ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावर कारवाई करा. सरकारने ही कारवाई दाखविण्याची हिम्मत दाखवावी. तुमच्या सरकारविरोधी बोलणाऱ्यावर कारवाई करता आणि सरकारमधील भ्रष्टाचाराला वाचविण्याचा प्रयत्न करतात, हे बरोबर नाही, असंही फडणवीस म्हणाले.