काँग्रेसला वगळून आघाडीचा प्रयत्न भाजपला मदत करणार ; ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसची नाराजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेस पक्ष व राहुल गांधी हेच गेल्या 7 वर्षांपासून पेंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रान पेटवून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहेत. भाजपसारख्या विभाजनवादी शक्तीविरोधात एकत्रित लढा देणे ही काळाची गरज असताना काही लोक भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेत आहेत.
2019च्या निवडणुकीतही असाच प्रयत्न केला गेला, ज्याचा फायदा भाजपलाच झाला होता, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर आज पुन्हा नाराजी व्यक्त केली.
भाजपच्या सत्ताकाळात सीबीआय, ईडी, आयकरसारख्या सर्व सरकारी यंत्रणांची भीती विरोधी पक्षांना दाखवली जात आहे; परंतु काँग्रेस अशा कोणत्याच दडपशाहीला भीक घालत नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी या सातत्याने पेंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात आक्रमपणे लढा देत आहेत. शेतकरी, कामगार, दलित, पीडित समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याचे पटोले म्हणाले. काही राजकीय पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवाईच्या भीतीने भाजपविरोधात बोटचेपी भूमिका घेत आहेत. काँग्रेस पक्ष मात्र रस्त्यावर उतरून पेंद्र सरकारविरोधात लढत आहे. अहंकारी सत्तेलाही सामान्य जनतेच्या शक्तीसमोर हार मानावी लागते हे शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले आहे. शेतकऱयांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे 12 मिनिटांत रद्द करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे व हा विश्वास दिवसेंदिवस आणखी वाढत आहे. काँग्रेस पक्षाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. काँग्रेस पक्ष भाजपच्या विरोधात ठाम उभा तसेच इतर पक्षही कोणाबरोबर आहेत हे देशातील जनतेला माहिती झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.