भाजपने केली शेतकरी विरोधी निर्णयाची होळी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :-
शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडुन शेतकऱ्यांचा अमानुष छळ करणारा शासनादेश राज्य सरकारने काढुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याने भाजपाने राज्य शासनाच्या निर्णयाची होळी करून महाविकास आघाडीच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला.
इतिहासात देशावर सत्ता असलेल्या निझाम व इंग्रजांनी भारतीय जनतेवर अमानुष अत्याचार केला असल्याचे सर्वश्रुत असतांना मात्र महविकस सरकार जणू काही त्यांचा विक्रम मोडू इच्छित असल्याप्रकारे शेतकरी बांधवांवर अन्याय करत आहे.
अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना न्याय देण्याची भूमिका सोडून या सरकारने नवीन अध्यादेश काढत त्वरित विजेचे एच.पी.नुसार पैसे भरा अन्यथा वीज कनेक्शन कापू असा फतवा जारी केला आहे.या सरकारच्या शेतकऱ्यांप्रति केवळ संवेदना मेलेल्या नाहीत तर हे राज्य सरकारच शेतकऱ्यांसाठी मेलेलं आहे.त्या मुळे शासनाने काढलेल्या या निर्णयाची होळी भाजप महागाव कडून शनिवार रोजी विद्युत वितरण कार्यलय समोर करण्यात आली.यावेळी तालुका अध्यक्ष दिपक आड़े,जिल्हा सचिव विलास शेबे,तालुका सरचिटनिस योगेश वाजपेयी,शहरअध्यक्ष सुरेश पाटिल नरवाडे,कृउबा संचालक अमर दळवी,राहुल आड़े,संतोष पवार,अंबादास भिमटे पाटिल, रघुनाथ नरवाडे, अँड. कैलास वानखेड़े,रविराज कावळे,शेतकरी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.