अबब…चोरट्यांनी मारला काजू बदाम वर डल्ला ; पोलिसांच्या निष्क्रितेवर प्रश्नचिन्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
मध्यरात्री बंद असलेल्या किराणा दुकानाच्या मागील बाजूस असलेला दरवाजा तोडून दुकानातून काजू ,बदाम , गोडंबी, सुपारी, चहा पत्ती,मसाले आणि नगदी रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज (ता.१४) सकाळी ७ वाजता महागाव तालुक्यातील मोरथ येथे उघडकीस आली आहे.त्यामुळे महागाव तालुक्यातील वाढती गुन्हेगारी आणि चोरीच्या प्रकरणाने महागाव पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार , सय्यद अली अकबर अली हे नेहमी प्रमाणे आपले किराणा दुकान बंद करून घरी गेले.

त्यानंतर मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेला दरवाजा तोडून काजू ३.५०० कीलो किलो ,बदाम २.५ किलो गोडंबी ३ किलो, सुपारी ५ किलो ,चहा पत्ति ५ किलो, मसाले व नगदी रोकड १८ हजार असा अंदाजित ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.याबाबत सय्यद अली अकबर अली यांनी महागाव पोलिसांत तक्रार दिली असून वृत्त लिहेपर्यंत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..