पुरस्थितित पुलावरून मार्ग काढताना दोन युवक गेले वाहून ; काळी दौ. परिसरातील वसंतनगर येथील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
काळी दौ ते दिग्रस मार्गावर असलेल्या वसंत नगर येथील पुलावरून पाण्यातुन दुचाकी ने मार्ग काढताना दोन युवक वाहून गेल्याची घटना ६ सप्टेंबरच्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घटना घडली. ज्ञानेश्वर जाधव (२८), सुरेश महिंद्रे (२७) रा. साई ईजारा ता. महागाव असे वाहुन गेलेल्या युवकाचे नाव आहे.
आज सायंकळ पासून काळी (दौ) सह परीसरात संततधार पाऊस सुरुच आहे. त्यातच वसंत नगर वरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते.

त्या पाण्यातुन दुचाकी क्रमांक एम. एच. २९ ए. व्ही. ००७४ काढण्याचे प्रयत्नात हे दोन्ही युवक वाहुन गेले आहे.
या बाबत दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांना माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक उपनिरीक्षक गुणवंत गोटे व सहकाऱ्यांना घटना स्थळी रवाना करण्यात आले.वाहून गेलेल्या युवकापैकी एक युवक मृत्वस्थेत आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली असून दुसऱ्या युवकाचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..