अरुणावती धरणाचे दरवाजे उघडणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जलसाठा ९१ टक्के
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे मो-९३७०४६४८२४
दिग्रस
दोन दिवसांपासून सायंकाळी झालेल्या मुसळधार पाऊस मुळे अरुणावती धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाणी पातळी मध्ये सातत्याने वाढ होत आहे. सद्य स्थितीत (सायं. ७:०० वाजता) धरण ८७.६५ % (३३०.२५ मी.)भरले आहे. सप्टेंबर महिन्याची नियंत्रण पातळी १००% (३३०.८५ मी.) आहे. धरणामधील पाण्याच्या येवा मध्ये वाढ होण्याची शक्यता असून नियंत्रण पातळी गाठल्यास धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील.
तरी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.
अरुणावती धरणाचा पाणीसाठा ९ वा.ची नोंद ९१.२५ टक्के असल्याचे तहसीलदार राजेश वझीरे यांनी सांगितले.