दिलासा : ईसापुर धरण 81%टक्के भरले 96% पाणी साठा झाल्यावर नदीपात्रात सोडणार पाणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यु.एन. वानखेडे
पुसद :
यवतमाळ व हिंगोली या दोन जिल्ह्याच्या सीमेवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापुर धरण आहे. हे धरण पेनगंगा नदीच्या स्त्रोतांकडून मुखाकडंच पहिले मोठे धरण आहे .
धरणाची अंतिम सिंचनक्षमता एक लाख सात हजार हेक्टर असून 95 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी घोषित करण्यात आलेले आहे. ईसापुर उजवा कालवा 119 किलोमीटर व डावा कालवा 84 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या धरणाचे पाणी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व पुसद तालुक्याला तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत तालुक्याला आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर, हदगाव, अर्धापूर, मुदखेड या तालुक्याला सिंचनासाठी मिळते. या धरणामुळे यवतमाळ हिंगोली आणि नांदेड या तीनही जिल्ह्याला सिंचनाचे पाणी उपलब्ध होते.हे धरण किमान तीन वर्षातून एकदा पूर्ण क्षमतेने भरत असते यावर्षी हे धरण 81 टक्क्यांपर्यंत भरले असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाळा बाकी असून धरणक्षेत्रात पाण्याची आवक चालू असल्याने आणि धरणातं96% पाणी साठा झाल्यावरच गेट मधून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार अशी माहिती धुळगंडे उपविभागीय अभियंता ईसापूर यांनी पॉलिटिक्स स्पेशल ला बोलताना सांगितले.
असाच पावसाळा असल्यास या महिन्यात धरण भरण्याची शक्यता आहे.