“भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसींचे योगदान त्यांना भारतरत्न द्यावा लागणार”, राऊतांचा टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल विरोधी पक्षाला धक्का लावून गेला आहे. भाजपने बहुमत मिळवत ३०० च्या आसपास टप्पा गाठत आपली ताकत दाखवून दिली आहे. राम मंदिर, शेतकरी आंदोलन असे विविध मुद्दे असताना भाजपने सर्वाधिक जागा जिंकत विरोधी पक्षाला दम भरवला आहे.
कॉंग्रेस आणि मायावतींचा बहुजन पक्ष यांना अतिशय निराशादायक निकाल लाभला आहे. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
“भाजपला मोठा विजय मिळाला आहे. यूपी त्यांचे राज्य होते पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. भाजपच्या विजयात मायावती (Mayawati) आणि ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचे योगदान आहे. या सर्वांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावे लागणार आहेत. आम्ही आनंदी आहोत. विजय आणि पराभव आहेत. तुमच्या आनंदात आम्हीही आहोत.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान उत्तर प्रदेशातील निकालावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी व मित्रपरिवार १८० चा आकडा गाठेल असे चित्र शेवटपर्यंत होते. तसा प्रतिसाद त्यांना मिळत होता, पण यादवांना दीडशेचा टप्पा गाठता आला नाही. मायावती या कुठेच नव्हत्या व त्यांनी भाजपशी अंतर्गत हातमिळवणी करून एकप्रकारे योगीबाबांना मदत केली. असेही राऊत यांनी म्हटले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..