“द कपिल शर्मा शो” मध्ये दिसणार नाहीत नवज्योत सिंह सिद्धू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना सगळीकडूनच हार पत्करावी लागत आहे. पंजाब विधानसभा निवडणूकांमध्ये नवज्योत सिंह सिद्धू यांना हार पत्करावी लागली आहे. सिद्धू यांनी पक्ष बदलला, शक्य ते सर्व प्रयत्न केले पण मुख्यमंत्री पद त्यांना मिळू शकलेलं नाही.
या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे. एवढंच नाही तर त्यांचं राजकीय कारकिर्दही संपल्यानं ते लवकरच कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा दिसणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर शोच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत सिद्धू या शोमध्ये पुन्हा दिसणार नसल्याचं म्हटलं आहे.
एकीकडे निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि दुसरीकडे ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनीही आपला निकाल सांगितला आहे. यावरून आता सिद्धू यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची तर मिळू शकली नाहीच पण त्यांनी कपिल शर्मा शोची खुर्ची देखील गमावली असं बोललं जात आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांच्याबाबत निर्माते अशोक पंडित यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे.
अशोक पंडित यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘ज्या लोकांना नवज्योत सिंह सिद्धू यांच्या कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याविषयीची चिंता आहे. त्यांना मी सांगू इच्छितो. Federation Of Western India Cine Employees ने नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं नॉन को- ऑपरेशन जारी केलं आहे. याचा सरळ अर्थ आहे की ते ‘कपिल शर्मा शो’मध्ये वापसी करू शकत नाहीत.’

अशोक पंडित यांच्या या ट्वीटनंतर नवज्योत सिंह सिद्धू यांचे चाहते निराश झाले आहेत. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून ‘द कपिल शर्मा’ शो देखील सतत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोच्या मेकर्सनी नकार दिल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केल्यानंतर हा शो चर्चेत आला होता. ज्यामुळे शो बंद करावा अशी मागणीही सोशल मीडियावर होताना दिसली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..