राज्यात ओमिकॉनचे रुग्ण वाढले ; अजित पवार म्हणाले केंद्राने…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढला असून पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ७ रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर आता चिंता वाढली असून, राज्य सरकार नवे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.
त्याच पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही चिंता व्यक्त केली आहे. निर्बंध लागू करणार का असा प्रश्न विचारला असता, आम्ही नियमांचे पालन होत की नाही हे बघत आहोंत असं त्यांनी सांगितलं. तसेच केंद्राने देखील नियम कठोर केले पाहिजे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग होत आहे. देशपातळीवर आरोग्य विभागाने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
अजित पवार यांनी यावेळी बोलताना लोक कार्यक्रमांना गर्दी करत असल्याचं सांगितलं. काही राजकीय लोकांची लग्न झाली त्याला देखील प्रचंड गर्दी होती असं ते यावेळी म्हणाले. ओमिक्रॉन बाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. सध्या वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्याबाबत कडक भूमिका केंद्राने (Central Government of India) घ्यायला हवं. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळवर नियमांचं पालन होतं आहे की नाही याकडे लक्ष द्यायला हवं. कारण कोरोनाची सुरुवात मुळात भारतात एक जोडपं दुबई वरून आलं होतं आणि त्यांनी प्रवास केल्यानंतर त्यांच्या सोबतच्या ड्राइव्हरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा प्रसार झाला होता. आत्ताच्या देखील काळात वेगवेगळ्या राज्यात एक दोन रुग्ण सापडत आहेत असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, देशपातळीवर आरोग्य विभाग आणि डब्ल्यूएचओ नवं नियमांबाबत एक सूचना काढणं गरजेचं आहे असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच जे दोन डोस घेतलेले आहेत त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे बूस्टर डोस बाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा असं त्यांनी सांगितलं.