पंजाब कडे ४०३ मृत शेतकऱ्यांची नोंद :- राहुल गांधी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- शेतकरी आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर असंवेदनशील वर्तनाचा हल्ला चढविला आहे. पंजाब सरकारने ४०३ मृत शेतकऱ्यांची नोंद असून जाहीर माहितीमध्ये अन्य नावे आहेत.
या नावांची सरकारने पडताळणी करून वारसांना २५ ते ३० लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी राहुल गांधींनी आज केली. तसेच या नावांचा तपशील सोमवारी सादर करणार असल्याचेही सांगितले.
लोकसभेमध्ये कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या मृत्यूची केंद्र सरकारकडे नोंद नसल्याने भरपाईचा प्रश्नच नाही, असे म्हटले होते. याबाबत राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, की मृतांची नोंदच नाही तर भरपाई कसली, असे सरकार म्हणते आहे. मात्र, आम्ही थोडे काम केले आहे. पंजाबमधील कॉंग्रेसशासित सरकारकडे ४०३ मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची भरपाई दिली आहे. तर १५२ जणांच्या वारसांना नोकरी देण्यात आली. या व्यतिरिक्तची नावे अन्य राज्यातली आहे. ७०० पैकी पाचशेहून अधिक नावे इथेच असून उर्वरित नावे जाहीर माहितीतून घेऊन सरकारने पडताळणी करावी आणि भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल म्हणाले…
बलिदान देणाऱ्यांना भरपाई देण्याचीही तुमची इच्छा नाही.
पंतप्रधानांनी ज्या चुकीसाठी माफी मागितली. त्याच चुकीमुळे या ७०० जणांचा बळी गेला.
सरकारचे जे मित्र आहे त्यांच्यासाठी काहीही केले जाते.
पेट्रोल, डिझेलवरील करवाढीतून मिळणारे पैसे कुठे गेले.