गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्या :- जिल्हा अधिक्षक अधिकारी नवनाथ कोळपकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 01 सप्टेंबर :- शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तिमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवुन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरु करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना योजनेचा विमा हप्ता भरावा लागत नाही. तरी अपघातग्रसत शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता, व इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
पात्रता – महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले आई, वडिल, शेतकऱ्याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जण.
नुकसान भर्पाइची रक्कम- (अ).-अपघाती मृत्यू – रु.2 लाख., (ब) अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख. (क) अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.
विमा हप्ता भरावा लागत नाही- सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम प्रती शेतकरी रु.32.23 शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही.
विमा पॉलिसी कालावधी- 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022
सदर योजने अंतर्गत लाभास पात्र शेतकर्याने /शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वीत असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजने अंतर्गत लाभास पात्र असणार नाही.
आवश्यक कागदपत्रे- अ) लाभ घेण्याकरिता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे- i) विहित नमुन्यातील पुर्व सुचनेचा अर्ज व सोबत 7/12 उतारा किंवा 8-अ, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल (विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल), घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र), खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका.सदरचा दावा दुर्घटने नंतर शक्यतो 45 दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.
उपरोक्त कागदपत्र मुळ किंवा राजपत्रीत अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले अथवा स्वसाक्षांकीत (घोषणापत्र-ब नुसार) असल्यास ग्राह्य धरण्यात येइल. मृत्युच्या कारणाची नोंद सक्षम प्राधिकार्याने स्पष्ट केली असल्यास रासायनीक विश्लेषण अहवाल(व्हिसेरा अहवाल) या कागद पत्रांची आवश्यकता राहणार नाही.
अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालयात. विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येइल.
अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कळविले आहे.