…अखेर वसंत सहकारी साखर कारखाना अवसायनात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यु. एन.वानखेडे
यवतमाळ :
शेतकऱ्याची कामधेनु समजल्या जाणारा वसंत सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला आहे. वसंत सहकारी साखर कारखाना तालुका उमरखेड हा 15-16 मध्ये आर्थिक परिस्थिती अभावी बंद पडला. हंगाम 2018 19 मध्ये कारखाना पूर्णतः बंद पडला. कारखान्याच्या संचित तोटा वाढला असल्याने प्राधिकृत अधिकारी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. प्रादेशिक सहसंचालकअमरावती(साखर) अमरावती यांनी सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम10 2(1) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ अवसायनात काढण्यात आला.
या कारखान्यावर वाय. पी. गोतरकर,लेखापरीक्षक श्रेणी-1 अंतर्गत विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था साखर यवतमाळ यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
वसंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी पाठपुरावा केला असून कारखाना चालू करण्यासाठी देवेंद्र फडवणीस सुद्धा यांनी पाठपुरावा केला होता परंतु कारखान्यावरील आर्थिक बोजा वाढला असल्यामुळे हा कारखाना चालू झाला नाही. दरम्यान प्रशासक सुरेश महंत म्हणून त्यांनी वेळोवेळी टेंडर बोलून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न केला परंतु दोन वेळा टेंडर काढूनही हा कारखाना भाडेतत्वावर देण्यात आला नाही अखेरीस हा कारखाना अवसायनात काढण्यात आला.
कारखाना अवसायनात काढल्यामुळे या कारखान्यावरील व्याज व्याज कमी होणार आहे. विदर्भातील सहकारी तत्त्वावर चालणारा एकमेव कारखाना अखेर अवसायनात निघाला आणि शेतकऱ्याचा फार मोठे नुकसान होणार आहे. कर्मचाऱ्यांची व शेतकऱ्याची करोडो रुपयांची देणी या कारखान्याकडे असल्याने आणि हा कारखान्याचा कारखाना अवसायनात निघाल्याने अखेर सर्वात मोठी उपविभागातील असलेला सहकार तत्त्वावर साखर कारखाना अवसायनात निघाला. या विभागातील सर्व मंत्री आमदार प्रकरणी आपली भूमिका योग्य बजाऊ होऊ शकले नाही अशी भूमिका आता शेतकरीव्यक्त करीत आहेत.
1967 ला सहकारी तत्त्वावर स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी या शेतकऱ्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी कारखाना स्थापन केला होता परंतु अखेर शेतकऱ्याची कामधेनु असलेला कारखाना अवसायनात निघाला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या अथक प्रयत्नातून हा निर्माण झालेल्या कारखाना व त्यांच्याच नावाने असलेला कारखाना अवसायनात निघत आहे त्यामुळे हे महाविकासआघाडी सरकारचे अपयश असल्याचे बोलले जात आहे. या अगोदर स्व. सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना सुद्धा अवसायनात निघाला त्यामुळे पुसद पुसद भागातील जनप्रतिनिधी या बाबत उदासीन असल्याची भावना ऊस उत्पादक व शेतकरी करत असल्याची चर्चा होत आहे.
याबाबत आंबोडा येथील प्रगतिशील शेतकरी हनवतराव देशमुख यांनी सांगितले की हे महाविकास आघाडी सर्वात मोठे अपयश नसून यापूर्वीच सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना व आता वसंतराव नाईक साखर कारखाना ही शेतकऱ्याची कामधेनू असलेला अवसायनात निघाल्या ने शेतकऱ्याचा आता कोणीच वाली उरला नाही.