रा.ग्रा. आ. अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांना कामावर सरळ सेवेत समावून घ्या….! युवक कॉंग्रेस वै.स.वि. राज्य समन्वयक डॉ. केशवे यांचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकीरण देशमुख) :- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनातील अधिकारी व कर्मचारी यांना सरळ सेवेत समावून घ्या अशा मागणीचे निवेदन प्रदेश युवक कॉंग्रेस वैद्यकीय सहाय्यता विभागाचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशेवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नुकतेच दिले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयुष्याचे महत्वाचे १५ वर्ष आरोग्य सेवेत दिलेले असुन त्यांच्या बाबत शासनामार्फत योगय निर्णय घेण्यात येईल या आशेवर त्यांनी आत्तापर्यत कमी पगारावर आरोग्य सेवा चोख पणे बजावत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य सेवेमधील महाभरती घोषणा केलेली असून सदरील भरती पुढील महिन्यामध्ये होईल असे सांगितले आहे. परंतु आपले सरकार तयार होण्याच्या अगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्रीसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती, त्यांच्या अहवालानुसार आरोग्य सेवेच्या पदभरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचार्यांना ४०% टक्के आरक्षण प्रति वर्ष ३ मार्क आणि सेवा कालावधीनुसार वयोमर्यादे मध्ये शिथीलता देण्याबाबतची शिफारस करण्यात आली होती. परत ती या आधी केलेल्या पदभरती मध्ये त्या पैकी कोणतीही शिफारस मान्य न करता अभ्यास समितीच्या अहवालात आपल्या शासनामार्फत केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचे नमूद केले आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. नुकतीच आरोग्य मंत्र्यांनी पदभरती घोषणा केल्यामुळे कर्मचाऱ्यामधील असंतोषाचे प्रमाण अधिकच वाढले असुन आता ते सर्व कर्मचारी करा किंवा मरा ह्या पावित्र्यामध्ये आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामधील सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना सरळ सेवेत सामावून घेवून त्यांच्या १५ वर्षाच्या तपश्चर्येला न्याय द्यावा अशी विनंती निवेदनात केली आहे.