बंगाल हिंसाचाराच्या घटनेचा भाजपकडून निषेध ; महागाव तालुक्यात निदर्शने ; काळया फिती बांधून केला निषेध
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
निवडणूक प्रक्रिया संपताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला. गेल्या काही दिवसांत राज्यात विविध ११ भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत भाजपने तृणमूलला लक्ष्य केले असून बंगाल हिंसाचाराच्या घटनेचा महागाव तालुका भारतीय जनता पार्टी कडून काळया फिती बांधून निषेध केला आहे.
सत्तेवर येताच तृणमूल काँग्रेस हिंसाचार घडवून निष्पाप भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.शेकडो दुकाने,घरात जाळपोळ करून भाजप कार्यालयात तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी तोडफोड केली असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे महागाव तालुकाध्यक्ष दीपक आडे यांनी केला आहे.
या सर्व जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा कोविड १९ चे नियम पाळुन निषेध नोंदवला आहे. “लोकशाहीची हत्या करणारे ममता बॅनर्जी चा धिक्कार असो”, “तृणमूल काँग्रेसकी दादागिरी नही चलेगी”, “अमानवी कृत्याचा निषेध असो”, ” गुंडाराज नही चलेगा- जल्लोष नही उन्माद है” या सारख्या घोषणा देऊन व काळी फिती लाऊन निषेध करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध भागात भाजपा तालुकाध्यक्ष दीपक आडे यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….