धक्कादायक… यवतमाळ जिल्ह्यातील “रेकॉर्ड ब्रेक” मृत्यू आकडा ; २३ मृत्युसह जिल्ह्यात ९५३ नव्याने पॉझेटिव्ह तर ४५१ जण कोरोनामुक्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. १३ :
गत २४ तासात जिल्ह्यात ९५३ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ४५१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.तर आज यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना मुळे मृत्यू आकडा हा जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक आकडा नोंदविला गेला आहे. २४ तासात २३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ७०,७०,६२,७८ वर्षीय पुरुष व ४०,५६,६८,७६, वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ५२,६०,६५, वर्षीय महिला, पुसद येथील ५३ वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील ६० व ७५ वर्षीय पुरुष, वणी येथील ७० वर्षीय पुरुष व ७५ वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील ५२ व ५७ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, मारेगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६० वर्षीय पुरुष, नागपूर तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष आणि हतगाव (जि. नांदेड) येथील ५३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या ९५३ जणांमध्ये ६०० पुरुष आणि ३५३ महिला आहेत. यात यवतमाळ येथील ३९६ पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद १६८, उमरखेड ८३, पांढरकवडा ४९, आर्णि ४३, दिग्रस ३८, दारव्हा ३५, नेर २९, महागाव २२, घाटंजी २०, वणी १९, बाभुळगाव १५, मारेगाव १५, झरी १०, राळेगाव ४, कळंब ३ आणि इतर शहरातील ४ रुग्ण आहे.
मंगळवारी एकूण ४२३२ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ९५३ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ३२७९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७८६ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती २०५१ तर गृह विलगीकरणात १७३५ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३५५९१ झाली आहे. २४ तासात ४५१ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ३१०२३ आहे. तर जिल्ह्यात एकूण ७८२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ११.१२ असून मृत्युदर २.२० आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत ३२०००७ नमुने पाठविले असून यापैकी ३१७८२३ प्राप्त तर २१८४ अप्राप्त आहेत. तसेच २८२२३२ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.