दत्त शिखर संस्थान माहुरगडचे ३० वे महंत मधुसुदन भारती यांना देवाज्ञा….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (नांदेड) :- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र माहुर गड येथील श्री दत्तात्रय संस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती यांना आज शनिवार (दिनांक ४ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजता देवाज्ञा झाली.
भगवान दत्तात्रयांचे जन्मठिकाण असलेल्या श्रीदत्त शिखरचे ३०वे महंत१००८ श्री.श्री. मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती यांचे शनिवार (दि.४एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटाला वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्यांना समाधी देण्याचा कार्यक्रम उद्या रविवार (दि.५एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजता चे दरम्यान संस्थानच्या नियमाप्रमाणे श्री दत्त मंदिर परिसरात करण्यात येणार आहे.
मधुसूदन भारती महाराज हे दिनांक १४ मार्च १९७८ रोजी रथ सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर महंत म्हणुन संस्थानच्या गादीवर विराजमान झाले.तब्बल ४०वर्षे त्यांनी महंत म्हणुन याठिकाणी कारभार सांभाळला.संस्थानच्या विकास व भाविकांच्या सोई साठी त्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वच भक्त गणातून शोक व्यक्त केल्या जात आहे.

हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!