दिल्लीतील वादग्रस्त घोषणा भाजप कार्यकर्त्यांचाच कृत्य; नाना पटोले यांचा गंभीर आरोप; म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “दिल्लीतील ‘व्होट चोर, गद्दी छोड’ या आंदोलनात लागलेले वादग्रस्त घोषणा भाजपच्याच कार्यकर्त्यांनी दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
अशा पद्धतीने कट करून स्वतःला शिव्या घालून घेऊन राजकारण “नॉन बायोलॉजिकल माणूस” असलेले नरेंद्र मोदीच करून घेऊ शकतात, अशी बोचरी टीकाही पटोले यांनी केली. यापूर्वी बिहारमध्येही राहुल गांधीच्या सभेतून मोदींच्या आईला अपशब्द काढणारा माणूस भाजपशी संबंधित होता, हे नंतर लक्षात आले होते. दिल्लीच्या मोर्चामध्ये ही तशाच पद्धतीने घोषणा देऊन राजकारण घडवले जात असल्याचा आरोप काँग्रेसनेतेनाना पटोले यांनी केलाय. आमची मोदीविरोधातली घोषणा म्हणजे “वोट चोर गद्दी छोड” हीच आहे आणि हीच घोषणा कायम राहील असेही पटोले म्हणाले.
दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य रॅलीचे आयोजन
दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून व्होट चोरीच्या मुद्द्यावर आज (14 डिसेंबर) भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रामलीला मैदानावरील या जनसभेला राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. निवडणूक हेराफेरी आणि मतचोरीच्या विरोधात काँग्रेसकडून मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली होणार आहे. या रॅलीद्वारे काँग्रेस मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या रॅलीला संबोधित करतील. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश आणि सचिन पायलट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते देखील व्यासपीठावर उपस्थित राहतील. माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी देखील या रॅलीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
“व्होट चोर, गद्दी छोड” ही घोषणा
काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नसल्याने “व्होट चोर गद्दी छोड” ही घोषणा देऊन ही रॅली आयोजित केली जात आहे. दरम्यान, भूपेश बघेल यांनी आरोप केला की भाजप आणि निवडणूक आयोग एकत्रितपणे लोकशाही कमकुवत करत आहेत. काँग्रेस नेते उदित राज यांनी या रॅलीचे वर्णन एक जनआंदोलन म्हणून केले आणि म्हटले की हा केवळ पक्षाचा कार्यक्रम नाही तर लोकांच्या हक्कांचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठीचा लढा आहे. त्यांनी सामान्य नागरिकांनाही या रॅलीत सामील होण्याचे आवाहन केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..