उपकार्यकारी अभियंत्याचे नियंत्रण सुटल्याने विजेचा लपंडाव; आमदाराचे दुर्लक्ष ; शेतकऱ्यांचे हाल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
तालुका विकासाच्या दृष्टीने मागे असला तरी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने महागाव तालुक्याची बकाल अवस्था होत चालले आहे.स्थानिक विधानसभेत आमदारांचा चेहरा बदलला असला तरी महावितरण विभागाच्या कारभाराला लगाम लावण्यासाठी स्थानिक आमदार नामदेव ससाणे अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्ट आहे.उपकार्यकारी अभियंता यांचे कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटल्याने मागील दोन दिवसापासून शहरात अंधार पसरला आहे . उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यवतमाळ वरून कारभार पाहत असल्याने शहरवासीयांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे .
महावितरण उपविभाग अंतर्गत मान्सून पुर्व कामे केवळ कागदोपत्री झाल्याने मान्सून तालुक्यात धडकताच शहरातील वीज गुल होत असल्याचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोसाट्याच्या वारा तर सोडाच हवेची झुळूक जरी आली तरी नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाने कडक निर्देश दिले आहे.मात्र दिवसभर विजेचा पत्ता नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव बाहेर जावे लागत असल्याने निदर्शनास येत आहे . उपकार्यकारी अभियंता यांच्या मनमानी कारभार वाढला असून कर्मचाऱ्यावरील नियंत्रण सुटल्याने त्याचा परिणाम शहरातील नागरिकांना सोसावा लागत आहे .याकडे कार्यकारी अभियंता यांनी लक्ष केंद्रित करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.
स्मार्ट उपकार्यकारी अधिकाऱ्याने उपविभागीय कार्यालय हलवले ; शेतकऱ्यांत असंतोष :
मनमानी कारभाराचे धनी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी अपयशी थरत असलेल्या स्मार्ट उपकार्यकारी अभियंता त्याने चक्क कार्यालयात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच गावापासून जवळपास एक किमी अंतरावर हलवल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे .त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या उपकार्यकारी अभियंता चे सेवेतून निलंबित करावे अशी मागणी ालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
आ.ससाणे यांचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष का ?
विजेच्या संदर्भात तक्रारी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता चक्क एक किमी अंतरावर जावे लागत आहे. आलिशान कारभार पाहणाऱ्या उपकार्यकारी अभियंता यांच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी आ.ससाणे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले हा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.