बँकांतील ठेवींसंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचा आक्षेप
सहकारी बँका संपवण्याच्या दृष्टीने मोदी सरकारची वाटचाल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बँकांतील ठेवीसंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आक्षेप नोंदवला आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत सहकारी बँकांचे नियंत्रण दिल्याने सहकारी बँका संपवण्याकडेच केंद्र सरकार वाटचाल करत असल्याचे दिसते आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहकारी बँका संपवण्याच्या दृष्टीनेच मोदी सरकार वाटचाल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.