काँग्रेसला 55 वर्षांत जे जमले नाही, ते भाजपने 5 वर्षांत केले : नितीन गडकरी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
काँग्रेस सरकारला 55 वर्षांत ज्या गोष्टी जमल्या नाहीत, त्या केवळ 5 वर्षांत करण्याची कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केली आहे, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गडकरी यांनी व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने राष्ट्रवादाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. मोदी सरकारने माओवादी आणि दहशतवाद्यांवर वेळोवेळी कारवाई करुन हे दाखवून दिले आहे. देशातील लांगुलचालनाचा काळ आता संपला आहे.माओवादी आणि दहशतवाद्यांवर सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या राष्ट्रवादाला महत्व देण्यात येत आहे. व्होट बँकेचे राजकारण आता कमी होत आहे. कलम 370 रद्द करुन सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. याचबरोबर राम मंदिराची उभारणीतील अडथळे आता दूर झाले आहेत. भाजपने कधीही विचारसरणीपासून फारकत घेतलेली नाही, असे गडकरी यांनी सांगितले.