जातीय समीकरण निर्णायक ; भावना गवळींना सहाव्यांदा यवतमाळ-वाशिम लोकसभेची उमेदवारी मिळणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसघात मराठा-कुणबी तसेच बंजारा बहुल भाग अधिक आहे. आदिवासी समाजाची मतेही निर्णायक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत जातीय समीकरणे प्रभावी ठरलेली आहेत.
या मतदार संघात यवतमाळ जिल्ह्यातील चार तर वाशीम जिल्ह्यातील दोन विधानसभा या सहा मतदार संघांचा समावेश आहे. १९९९ पासूनच्या सलग पाच निवडणुकीत भावना गवळी या निवडून आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर त्या शिंदे गटात गेल्या. आता मात्र त्यांना उमेदवारीविषयी झगडावे लागत आहे.
२०१९ चे चित्र
भावना गवळी (शिवसेना) विजयी मते : ५,४२,०९८
प्रवीण पवार (वंचित) मते : ९४,२२८
वैशाली येडे (प्रहार) मते : २०,६२०
वर्चस्व
२००४ : शिवसेना
२००९ : शिवसेना
२०१४ : शिवसेना
२०१९ : शिवसेना
सद्य:स्थिती
महाविकास आघाडीतील संजय देशमुख यांची प्रचाराला सुरुवात.
भावना गवळी यावेळीही इच्छुक मात्र भाजप व शिवसेना शिंदे गटात ही जागा मिळविण्यावरून रस्सीखेच सुरू आहे.
शिंदे गटाचेच मंत्री संजय राठोड हे भाजपकडून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मतदारसंघात १४ तालुक्यांचा समावेश असून शहरीपेक्षा ग्रामीणचा अधिक समावेश.
हे मुद्दे प्रभावी ठरणार
कॉटन सेझ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग, महिलांची रोजगार उद्योगाचा अभाव.
सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव.
वर्धा-यवतमाळ-नांदेड, शंकुतला रेल्वेचा लांबलेला प्रवास
यवतमाळमधील अमृत पाणीपुरवठा योजना