खोट्या तकारी करणऱ्याचे धाबे दणाणून टाकणारा न्यायालयाचा निकाल ; सरपंचाविरुद्ध खोटी तक्रार देणाऱ्यास ५० हजाराचा फटका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- महिला सरपंचाची खोटी तक्रार करून मानहानी केल्या प्रकरणी ५०,०००/- रुपये नुकसान भरपाई देण्याचे वि. दिवाणी न्यायालय पुसद यांचे आदेश. सदर निकालामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे नक्कीच धाबे दणानतील.
पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत देवठाणा येथील गिरीजाबाई प्रल्हाद कांबळे हया सन २०१५ या वर्षाच्या ग्राम पंचायत च्या निवडणुकीत निवडुण आलेल्या सदस्य असुन तेथील त्या सरपंच सुध्दा आहेत. देवठाणा येथील विकास गणपत पडघणे यांनी त्यांच्याकडे शौचालय नसल्याने त्यांचे ग्राम पंचायत सदस्यपदा सोबत सरपंच पद रददबातल करण्या करीता वि. अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे न्यायालयात महाराष्ट्र ग्राम पंचायत अधि. १९५९ चे कलम १४ (१) (ज-५) नुसार तकार अर्ज दिले होते. सदरहु तकार अर्ज वि. अप्पर जिल्हाधिकारी एस. बी. महेंद्रकर यांनी दि. ०६/९/२०१९ रोजी तथ्यहिन असल्याने व गिरीजाबाई प्रल्हाद कांबळे यांचे कडे शौचालय असल्याने खारीज केले.
विकास पडघणे यांनी केलेल्या तकार अर्जाने गिरीजाबाई कांबळे यांची मानहानी व बदनामी झाल्याने त्यांनी पुसद येथील वि. २ रे दिवाणी न्यायाधिश डी. जी. मस्के कनिष्ठ स्तर पुसद यांचे न्यायालयात मानहानी व नुकसान भरपाई मिळणे करीता दावा दाखल केला होता. सदरचा दावा दि. २३/१/२०२४ रोजी दिवाणी न्यायालय यांनी निकाली काढुन मंजुर केला व गिरीजाबाई प्रल्हाद कांबळे यांना मानहानी व नुकसान भरपाई दाखल ५०,०००/- रुपये देण्या बाबत आदेशीत केले.
सदरच्या प्रकरणात वादी गिरीजाबाई प्रल्हाद कांबळे यांचे तर्फे ॲड. सतिश एस. भंडारी व त्यांचे सहायक ॲड. सविता एस. आढाव यांनी भक्कमपणे बाजु मांडली. अशा प्रकारे खोट्या तकारी करणऱ्याचे धाबे या न्याय निर्णयाने दणाणले आहे.