स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी मातोश्रीवर दाखल ; व पहा अनेक बातम्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
राजू शेट्टी थोड्याच वेळात घेणार उद्धव ठाकरेंची भेट.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील ५ हजार ट्रक चालक संपावर
अमरावती जिल्ह्यातील ५ हजार ट्रक चालक संपावर आहेत. अमरावती येथील अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. नवसारी चौकास ट्रक चालकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक, मनोज जरांगेंनाही निमंत्रण
आज मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपुर्ण बैठक पार पडणार आहे. आज दुपारी ४ वाजता ही बैठक पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मनोज जरांगे यांना देखील उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं आहे. मात्र, आपण या बैठकीला जाणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूर शहरातील २५ टक्के पेट्रोल पंप बंद
नागपूर शहरातील २५ टक्के पेट्रोल पंप बंद आहेत. पेट्रोल पंप ड्राय, वाडी रोड, नंदनवन, मेडिकल चौक, अजनी येथील पेट्रोल पंप बंद आहेत.
छगन भुजबळ आणि कुटुंबीयांना आजही दिलासा नाहीच
छगन भुजबळ आणि कुटुंबीयांना आजही दिलासा मिळालेला नाहीये. भुजबळ कुटुंबीयांना उच्च न्यायालयाने आयकर विभागाने बेनामी अपसंपदा संदर्भात केलेल्या ४ तक्रारी रद्द केल्या आहेत. या 4 तक्रारींवर स्पेशल कोर्ट आज शिक्कामोर्तब करणार होतं. तक्रारदार आयकर विभाग उपायुक्त डॉ पूजा गॅब्रियल कोर्टात हजर होत्या. मात्र,भुजबळ कुटुंब कोर्टात गैरहजर राहिले आहेत.
बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. लोकसभेसाठी पक्ष तयारीला लागले आहे.
वाहतूकदारांच्या संपाबाबत उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा- केसरकर
वाहतूकदारांच्या संपाबाबत उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. स्कूल बस चालवणाऱ्यांनी संपात सहभाग घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले आहेत.
प्रोफेसर वेद प्रकाश नंदा यांचे निधन, मोदींनी वाहिली श्रद्धांजली
प्रोफेसर वेद प्रकाश नंदा यांचे निधन झाले आहे. साहित्य आणि शिक्षा क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना २०१८ मध्ये पद्मभूषण देण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.