कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच, मनोज जरांगे मागण्यांवर ठाम ; नितेश राणेंनाही सल्ला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हिंगोलीच्या कुरुंदा गावात यलगार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर मराठवाड्यातील मनोज जरांगे पाटील यांची ही पहिलीच सभा आहे.
त्यामुळे मोठी गर्दी या सभेला होण्याची शक्यता वर्ववली जात आहे.
त्याआधी कुणबी प्रमाणपत्राबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, केंद्राने घटनादुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच असतात.
मर्यादा वाढवायची असेल तर तो केंद्राचा विषय असतो. आता काय करायचं ते राज्य सरकारने ठरवावे. आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावं, यावर आम्ही ठाम आहोत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्हाला डिवचू नये नितेश राणे यांना सल्ला – जरांगे पाटील
त्याआधी कुणबी प्रमाणपत्राबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, केंद्राने घटनादुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच असतात.
आमच्यावर टीका करू नये, नितेश राणे यांना सल्ला
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करावं, दुसऱ्यांवर टीका करू नये, असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले होते. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. ते बोलले म्हणून आम्ही बोलतो. त्यांनी डिवचलं म्हणून मी बोललो. टीका करू नये, टार्गेट करु नये आम्ही शांत बसतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. पण मी त्यांना आवाहन केलं, साथ द्या. आमच्या मराठा राजकीय नेत्यांना देखील आम्ही गृहित धरत नाही. आमच्या मराठा नेत्यांना त्यांना मोठं करण्यासाठी आम्ही लागतो. पण आमच्यासाठी ते नाहीत.आम्हाला त्यांची गरज पण नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….