सोनियांच्या पत्रानंतर काही तासांमध्येच विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट
आघाडीत तणाव
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यात कोरोनामुळे वातावरण धुमसत असतानाच विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विधान परिषदेसाठी दिल्लीतून काँग्रेसने एका उमेदवाराची घोषणा केली. त्याबाबतचं पत्र दिल्लीतून येताच शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलासा मिळाला. मात्र काही तासांमध्येच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस दोन जागा लढवत असल्याचं जाहीर केलं आणि उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.
काँग्रेसने दोन उमेदवार उभे न करता एक उमेदवार द्यावा आणि निवडणुक बिनविरोध व्हावी असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे.तशा प्रकारचा निरोप मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसकडे पोहोचवला आहे. मात्र काँग्रेस दोन उमेदवारांवर ठाम असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
शिवसेनेने हवे असल्यास एक उमेदवार द्यावा असं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे. मात्र काँग्रेस आक्रमक असून दोन उमेदवारांवर ठाम आहे. राज्यातल्या नेत्यांना दिल्लीतून तशा प्रकारच्या सूचना आल्या असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या संदर्भात काँग्रेसशी चर्चा करणार असून त्यातून मार्ग निघेल असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….