“दहशतवादी ऐकण्याची मला सवय आहे, पण.”, भाजपा खासदाराच्या शिवीगाळ प्रकरणावर ओमर अब्दुलांचा संताप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भाजपाच्या एका खासदाराने भर लोकसभेत दुसऱ्या खासदाराला शिवीगाळ केल्याचा प्रकार नुकताच पाहायला मिळाला आहे. लोकसभेतील चर्चेवेळी चांद्रयान मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप विरोधी बाकांवरून करण्यात आला होता.
त्यावर भाजपाचे दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी संतापले आणि विरोधकांना उत्तर देऊ लागले. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली उठून काहीतरी बोलू लागले. यावर बिधुरी म्हणाले, “मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी..तुला कधी उभं रहून बोलू देणार नाही. ए उग्रवादी..कटवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत… हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला.”
रमेश बिधुरी यांच्या या वक्तव्यानंतर बिधुरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीवर देशभरातून टीका होत आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ते फक्त दहशतवादी म्हणाले असते तर त्याची आम्हाला सवय झाली आहे. तुम्ही माझं सोशल मीडिया अकाउंट बघा. आम्हाला दहशतवादी बोलताना हे लोक कधीच थकत नाहीत. परंतु, दहशतवादी शब्दाबरोबर ते (बिधुरी) जे काही बोलले, त्यांचे ते शब्द मला इथे बोलून दाखवायचे नाहीत. मला या सगळ्याची लाज वाटते. आपल्या संसदेत अशा प्रकारचे शब्द वापरले गेल्याची मला लाज वाटते.
ओमर अब्दुल्ला म्हणाले, त्यांचे शब्द ऐकून मी नाराजही झालो, कारण ते शब्द देशातल्या तमाम मुसलमानांसाठी वापरले गेले आहेत. मला एक गोष्ट कळत नाही की जे मुसलमान भाजपात आहेत किंवा भाजपाशी संबंधित आहेत, ते लोक हे सगळं कसं काय सहन करतात? मी भाजपाबाहेर आहे तरीदेखील हे सहन करणं मला अवघड जातंय. परंतु, जे लोक भाजपाबरोबर मिळून काम करत आहेत त्या लोकांना रात्री झोप कशी येते? आपलेच सहकारी आपल्याबद्दल अशा प्रकारचा विचार करतात हे समजल्यावर त्यांना झोप कशी लागते?
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते म्हणाले, त्यांनी वापरलेले हे शब्द तमाम मुस्लीम समाजाबद्दल आहेत. हे सगळं केवळ एका खासदाराबद्दल नाही. यामधून कळतंय की त्यांचे (भाजपा) मुसलमानांबद्दल काय विचार आहेत. ते आमच्याबद्दल नेमका काय विचार करतात ते यातून समजतंय. सरकारला याची लाज वाटली पाहिजे. देशाची संसद नवी आहे परंतु, तिथल्या लोकांचे विचार मात्र तेच जुने आणि घाणेरडे आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..