‘समृद्धी’वर १६ मजुरांवर काळाचा घाला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून दखल; ट्वीट करत म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. बुलढाण्यात झालेल्या अपघाताला एक महिना उलटत नाही तोवर समृद्धीवर दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १६ जणांचे प्राण गेले आहेत. समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रात्रकालीन काम सुरू असताना शहापूर सरंळाबे येथे क्रेन आणि स्लॅब कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघाताची दखल राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.
“शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत ३ कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असं ट्वीट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

“शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो”, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम जोरात सुरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजतं आहे. शहापूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री ११ च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा मृत्यू झालाय.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..