भागलपूर येथे ११०० कोटी रुपयांचा पूल कोसळला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पटना :- बिहारच्या भागलपूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल ११०० कोटी रुपयांचा निर्माणाधिन पूल कोसळला आहे. याचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
एका नदीवर बांधण्यात येणारा हा पूल कोसळला होता. बिहारच्या भागलपूर येथे ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
एवढा मोठा निधी असलेला हा पूल नेमका का कोसळला? याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाचा पैसा अक्षशः पाण्यात गेल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, गुजरातमधील मोरबी इथं गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेवरुन देशभरात बराच गदारोळ माजला होता. पण हा पूल कशामुळं कोसळला याचा खुलासा आता झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गुजरात सरकारनं नेमलेल्या एसआयटीनं हा खुलासा केला आहे.
अजंता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडनं (ओरेवा ग्रुप) मच्छू नदीवर ब्रिटिशकालिन सस्पेंशन ब्रीजच्या देखभालीची जबाबदारी होती. त्यानुसार एसआयटीला या पूलाची डागडुजी, देखभाल आणि नियंत्रणात अनेक चुका आढळून आल्या होत्या.