आत्मा जिल्हा अंतर्गत भाजीपाला उत्पादन व निर्यात व्यवस्थापण शेतकरी प्रशिक्षण शिबीर
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- सडक अर्जुनी येथे तालुका कृषी अधिकारी व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) सडक अर्जुनीच्या वतीने आत्मा जिल्हा अंतर्गत जिल्हा स्थारिय भाजीपाला उत्पादन व निर्यात व्यवस्थापण शेतकरी प्रशिक्षण शिबीर तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आले.
सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुका कृषि अधिकारी व आत्मा अंतर्गत जिल्हास्थारिय शेतकरी प्रशिक्षण शिबीर तालुका तंत्रज्ञान (आत्मा) व्यवस्थापक राखी कहालकर यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन पंचायत समितीचे सभापती गिरधारी हत्तीमारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती राजेश काठाने, मंडळ कृषी अधिकारी कु. प्रतीक्षा मेंढे तसेच तंज्ञ मार्गदर्शक म्हणून नागपूर चे कृषी तंत्रज्ञ डॉ. गिरीश निखाडे, प्रफुल्ल बांडबुचे उपस्थित होते. यावेळी कृषी तंत्रज्ञ डॉ. गिरीश निखाडे यांनी शेतकऱ्यांनी धान पिकानंसोबत बागायती पिकांचे ही उत्पादन करण्याचे आवाहन केले.तसेच प्रफुल्ल बांडेबूचे यांनी शेतकऱ्यांना प्रोजेक्टरवर भेंडी, लवकी,चवळीच्या सेंगा, टोमॅटो व इतर पालेभाज्या फळ बागायती सेंद्रिय खाताद्वारे शेतात कसे उत्पादन करता येते या बद्दल मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले तालुका कृषी अधिकारी पात्रीकर यांनी सेंद्रिय खत कसे तयार करावे,सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले व शेतीविषयक विविध माहिती दिली तसेच प्रमुख अतिथींनी शेतकऱ्यांनी धान पिकानंसोबत बागायती पिकांचे ही उत्पादन करण्याचे आवाहन केले. यावेळी संचालन व आभार तालुका तंत्रज्ञान (आत्मा) व्यवस्थापक राखी कहालकर यांनी केले तर आभार सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक जी. एस. मस्के यांनी मानले.यावेळी कृषि सहायक सुशील वाघाये, जे. एस. लांबकाने,संजय कुंभलवार,जे. पी. राऊत, अपूर्वा गहाने, वीरेंद्र बिसेन, जे.सी. वाढई, जी. एस मस्के तसेच तालुक्यातील शेतकरी,नागरिक व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….