राष्ट्रवादीला मोठा धक्का…! शरद पवारांच्या निकटवर्तीयाचा भाजपमध्ये प्रवेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाण्यात राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्या गटाने खिंडार पाडलं आहे. शिंदे गटापाठोपाठ आता भाजपने देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
तर दुसरीकडे ठाण्यातील राष्ट्रवादीचे चार माजी नगरसेवक हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दशरथ तिवरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
त्यांच्यावर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, टीडीसी बँक अध्यक्ष, जिल्हापरिषद सदस्य , जिल्हा परिषद कृषी सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मुंबई बँकेचे संचालक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, आणि आता महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या.
तर महाविकास आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. माढा तालुक्यातील टेंभूर्णीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
बच्चू कडू यांच्या संपर्कात महाविकास आघाडीमधील 10 ते 12 आमदार आहेत. तर 8 ते 10 आमदार माझ्या संपर्कात असल्यानं एकूण 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. आगामी अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे 10 ते 12 आमदार फुटणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. इतर पक्षातल्या 10 ते 12 आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….