‘शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, 16 आमदार अपात्र ठरतील’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. या अधिवेशनात सरकारचा गोंधळ पाहायला मिळाला.
सरकारमध्ये आता दोन गट पडले असून हळूहळू चित्र बदलतंय, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं. ते नाशिक दौऱ्यावर आले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही असं मी बोललो होतो. यावरती अजूनही मी ठाम आहे. कायद्यानुसार, 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. त्यामुळं हे सरकार सध्या व्हेंटिलेटवर आहे. हे सरकार कधी उलथवायचं हे जनतेला चांगलं ठाऊक आहे, असंही ते म्हणाले.
शिवसेना एकच आहे आणि कायम एकच राहील. उध्दव ठाकरेंसोबत अख्या महाराष्ट्र उभा आहे. त्यामुळं नाशिकचे शिवसैनिक जागेवरच आहेत, ते कुठंही जाणार नाहीत. सध्या राज्यातलं वातावरण परिवर्तनाच्या दिशेनं सुरु आहे, त्यामुळं हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा पुनरुच्चार राऊतांनी केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं.