गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता ; अमृता फडणवीसांचं मोठं विधान.…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याकडे नेहमीच महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. त्यांच्या अनेक वक्तव्यांवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.
मात्र मी कुणालाच घाबरत नाही. सामान्य नागरिक माझ्यावर टीका करत नाहीत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे मला महत्वाचे वाटत नाही, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आयुष्यात त्या सर्वात जास्त कोणाला घाबरतात याचा खुलासा केला आहे. तसेच आपल्या देशात दोन राष्ट्रपिता आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी नागपूर येथे अभिरुप न्यायालय पार पडले यावेळी अमृता फडणवीस यांनी संघात माझी तक्रार केल्याचं म्हटलं. त्या म्हणाल्या की, ” मला राजकारण आवडत नाही. मला त्यात रसही नाही. त्यामुळे मी खूप कमी राजकीय गोष्टींवर मत देत असते. माझ्यासाठी आणि देवेंद्रजींसाठी हे चांगल फायद्याचं आहे. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत.” असे अमृता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
“मी आधी फार शांत आणि लाजरी होते. पण आता मी माझी मतं ठामपणे मांडते. मी खूप जास्त बोलते असे संघात सांगण्यात आले होते. मात्र माझ्या बोलण्याचा फायदा लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेत आहेत. ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. मी खूप बोलते हे अगदी खरं आहे. मात्र माझा स्वभावच तसा झाला आहे. कोणतीही प्रतिमा तयार करण्यासाठी मी जास्तीचे बोलत नाही.” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
अमृता फडणवीस या दोन व्यक्तींना खूप घाबरतात
जे २४ तास राजकारणासाठी काम करतात आपला पूर्ण वेळ जनतेसाठी देतात तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मला कोणतेही वक्तव्य करताना कोणाचीही भीती वाटत नाही. कारण मी फक्त माझी आई आणि सासूबाई या दोघींनाच घाबरते. इतर कोणत्याही व्यक्तीची मला भीती वाटत नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.