महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी, फडणवीसांची अजितदादांसोबत बैठक, राज ठाकरेंनाही भेटले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज बैठकींचा सिलसिला सुरू आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.
यानंतर काहीच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली. कोकण महामार्गाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. फडणवीस-अजित पवार बैठक दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. आगामी हिवाळी अधिवेशनाआधी ही बैठक झाली.
2022 च्या पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयकावर दिलेल्या आश्वासनानुसार या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सामान्य प्रशासन, गृह, कृषि, नगरविकास, वैद्यकीय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग इत्यादी विभागांच्या विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
फडणवीसांसोबतच्या बैठकीआधी काय म्हणाले अजित पवार? फडणवीसांना भेटण्याआधी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला, यात त्यांनी काल महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर झालेल्या बैठकीवर भाष्यं केलं. कारण नसताना कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला.
त्यांनी वक्तव्य केले नसते तर असे झाले नसते. यामुळे जे काही महाराष्ट्र बॉर्डरवर गावात जे मत प्रदर्शित झाले ती भावना पण राज्याच्या दृष्टीने अडचणीत आहे. कर्नाटक समंजस भूमिका घेतली पाहिजे, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. ‘समिती नेमली गेल्या.
चर्चा झाली, आंदोलन झाली. या आधीही झालं. त्यातून वाद होत राहिले. चर्चा होते तेव्हा काहीतरी सकारात्मक तोडगा निघाला समंजस भूमिका घेतली पाहिजे. हे बसल्यावर चांगल निघावे ही मनापासून भावना आहे.
आजपर्यंत अनुभव ,अनेक दिग्गज प्रयत्न केले पण यश आले नव्हते. आधी तोडगा काढायचा प्रयत्न झाला होता. रेल्वे लाईन पलीकडे कर्नाटक आहे. अलीकडचे महाराष्ट्राकडे अशी चर्चा झाली आधी ही चर्चा होऊन बराच काळ होऊन गेला.
ही समिती झाली यातून चांगल बाहेर यावे ही अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवलं जाईल असे वाटते, असंही अजितदादा म्हणाले.
महाविकासआघाडीचीही बैठक दुसरीकडे 17 डिसेंबरला मुंबईमध्ये महाविकासआघाडीचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठीही महाविकासआघाडीची बैठक आज होत आहे. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी महाविकासआघाडीचे सगळे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार होता, पण मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.